मुंबई महानगर मतदार यादी प्रमुख मेळावा. #मुंबई #Mumbai #rajthackerey #RajThackeray
आज १९ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईतील गोरेगाव येथे मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुख मेळाव्याला' संबोधित केलं... या संबोधनातील प्रमुख मुद्दे.... यावेळी जेव्हा आपण ठरवू तेव्हा निवडणूक लागेल. २०१७ साली वोटिंग मशीन आणि मतदार याद्यांसंदर्भात मी पत्रकार परिषद घेतली होती. पण त्यावेळी अनेकांना त्याचं गांभीर्य समजलं न्हवतं. पुढे होणाऱ्या निवडणुकांसाठी जवळपास ९६ लाख खोटे मतदार यादीमध्ये भरले आहेत. अशा निवडणुका जर आपल्या देशात होणार असतील तर कशासाठी निवडणुका लढवायच्या, पैसे खर्च करायचे आणि मतदान करायचं? आम्ही जर निवडणूक आयोगाला मतदार याद्या सुधारायला सांगतोय मग, सत्ताधारी यावर का उत्तर देतायेत? नरेंद मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले होते ते आम्ही आज सांगतोय यात चूक काय? सत्ताधारी पक्षाचे आमदार विलास भुमरे जाहीर भाषणात सांगतात मी २० हजार मतदान बाहेरून आणलं, इतकी यांची हिंमत कशी होते? सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांनीही मतदार यादीबाबत संशय व्यक्त केला आहे. मग यावर आम्ही बोललो तर चूक काय? महाराष्ट्रातील प्रमुख शहरं अदानी, अंबानीला आंदण देण्यासाठी हे सगळे सुरू आहे. ज्यावेळी गुजरातचा वरवंटा या महाराष्ट्रावर फिरेल त्यावेळी भाजपला मतदान करणारा मराठी माणूसही त्यात भरडला जाईल. मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर उभं राहून विकास होणार असेल तर मी खपवून घेणार नाही. माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक मतदाराला माझी विनंती आहे, सतर्क राहा, आमची माणसं ज्यावेळी तुमच्याकडे येतील तेव्हा त्यांना सहकार्य करा. जोपर्यंत मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा. महाराष्ट्रातील निवडणुका शांतपणे पार पाडायच्या असतील तर पहिले मतदार यादी स्वच्छ करा, जो खरा मतदार आहे त्याला मतदान करू देत. सत्तेवर कोण येईल याच्याशी मला कर्तव्य नाही. पण जे मतदान होईल ते खरं होईल या दृष्टिकोनातून निवडणुका झाल्या पाहिजेत. तुम्ही मतदान करा किंवा करू नका, मॅच फिक्सिंग झालेलं आहे. अशा प्रकारच्या निवडणुका हा मतदारांचा अपमान आहे. #rajthackerey #MNS #Mumbai #मुंबई #ElectionCommision #TransparencyInElection


📍 आनंद आश्रम, #ठाणे | #मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा विभागातील प्रभाग क्रमांक १७३ मधील उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह, शाखा संघटीका नंदा बापू शाहू, उपशाखा संघटीका नंदा पाटसुभे, सुचित्रा कावळे, दीपिका नेमन, श्वेताली खेडपकर, देविका नायर आणि सर्व पदाधिकारी यांचाही पक्षप्रवेश झाला. यासोबत रेखा तिवारी, मालन सावंत, लक्ष्मी कोतवाल, अनिता सावंत, अपूर्वा पालव, युवासेना अधिकारी सचिन पडवळ, सहार येले, विनोद शर्मा यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. मुंबईतील अनेक माजी लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. त्यांच्या भागांतील प्रश्न त्यांनी यावेळी वाचून दाखवले असून त्यातील बहुतांश प्रश्न हे म्हाडा आणि एसआरए प्राधिकरणाची संबंधित असून ते शासनाच्या माध्यमातून नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू असे सांगून त्यांना आश्वस्त केले. तसेच गेल्या अडीच वर्षाचा माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, मुंबईचे सुशोभिकरण, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, कॅशलेस वैद्यकीय सेवा, डीप क्लीन ड्राइव्ह असे अनेक उपक्रम आपण शहरात राबवले. कोस्टल रोड, अटल सेतू, महालक्ष्मी रेस्कोर्सच्या जागेवर तयार होणारे सेंट्रल पार्क असे अनेक प्रकल्प मार्गी लावले. त्याद्वारे मुंबईचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आम्ही केला असून यापुढेही करत राहू असे यावेळी बोलताना नमूद केले. यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, माजी शिक्षण समिती सभापती मंगेश सातमकर, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना सचिव संजय मोरे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. #shivsena #Mumbai #EknathShinde #maharashtra @EknathShinde



